कारगिल विजय दिवस इतिहास अणि महत्व, कोट्स आणि शुभेच्छा – Kargil Day information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

कारगिल विजय दिवस इतिहास अणि महत्व

मित्रांनो कारगिल दिवस हा भारतात निवास करत असलेल्या प्रत्येक नागरीकासाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो.

कारण हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य अणि पराक्रमाचा दिवस मानला जातो.कारण ह्या दिवशी भारताने पाकिस्तानला हरवून विजयी ध्वज फडकवला होता.

आजच्या लेखात आपण ह्याच महत्वाच्या दिवसाबाबद माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यात हा दिवस का साजरा केला जातो?कसा साजरा केला जातो?याचा मुळ इतिहास काय आहे?आपण इत्यादी बाबींचा आढावा घेणार आहे.

1)भारतात कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो?

दरवर्षी भारतामध्ये कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी साजरा केला जात असतो.

2) 26 जुलै रोजी काय झाले होते?

भारत अणि पाकिस्तान या दोघे देशांमध्ये युदध घडुन आले होते.हे युदध 1999 च्या सुमारास 26 जुलै रोजी संपुष्टात आले होते.ज्यात भारताने पाकिस्तानला पराभुत करण्यात यश प्राप्त केले होते.

3) कारगिल विजय दिवस का अणि कसा साजरा केला जात असतो?

भारत अणि पाकिस्तान या दोघा देशांमध्ये जे भीषण युदध घडुन आले.त्यात तब्बल 60 दिवस युदध केल्यानंतर 26 जुलै 1999 रोजी भारताचा विजय प्राप्त झाला.हा विजय साजरा करण्यासाठी हा कारगिल विजय दिवस दरवर्षी साजरा केला जात असतो.

याव्यतीरीक्त याच दिवशी ह्या युदधात शहीद झालेल्या भारतीय वीर जवानांना स्मरण केले जाते.त्यांनी देशासाठी दिलेल्या त्यांच्या त्याच बलिदानाची या दिवशी आठवण केली जाते.

भारतीय लष्कराच्या शोर्याचे कौतुक करणारा हा दिवस आहे.या दिवशी देशाचे पंतप्रधान अमर जवान स्तंभ येथे जाऊन भेट देतात.शहीद जवानांची आठवण काढुन त्यांना श्रद्धांजलि अपर्ण करत असतात.

कारगील विजय दिवस इतिहास –

लेह अणि श्रीनगर ह्या राष्टीय महामार्गावर कारगिल हे ठिकाण आहे.अणिपाकिस्तान अणि भारत या दोघांमध्ये ह्याच मार्गावरून युदध घडुन आले होते.कारण भारतीय लष्करामधील अनेक चौक्या ह्या कारगील रस्त्यावर आहेत.

See also  नीट पीजी २०२३ परीक्षेचा निकाल घोषित - NEET PG 2023 result in Marathi

अणि पाकिस्तान ह्या देशाने 1999 मध्ये ह्या भागातील रिकाम्या चौक्यांवर आपला अवैधरीत्या घुसखोरी करून ताबा मिळविला.ह्या पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी भारताने तातडीने आँपरेशन विजय सुरू केले.

भारताच्या वायुसेनेने देखील आँपरेशन सफेद समुद्र हे सुरू केले.ज्यात सैन्याची पायी ने आण करण्याची सोय भारतीय वायुसेनेकडुन करण्यात आली.

पाकिस्तानच्या ह्या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने देखील पाकिस्तानची बंदरे टारगेट केली अणि त्यामधील जहाजांना कोंडीस आणले.

भारताकडुन 1999 मधील जुलै महिन्याच्या दुसरया ते तिसरया आठवडयापर्यत अनेक कार्यवाही करण्यात आल्या.

ज्यात चकमकीमध्ये काही भारतीय जवान शहीद देखील झाले.काही गंभीर जखमी देखील झाले.साठ दिवस तब्बल हे युदध चालले होते.ह्या युदधात दोन ते तीन लाख भारतीय सैनिक समाविष्ट होते.

कारगिल विजय दिवस कोटस अणि शुभेच्छा kargil Vijay diwas quotes and wishes in Marathi

1)नमन माझे त्या प्रत्येक देशातील भुमीपुत्राला जो सीमेवर उभा राहुन आपल्या मातृभुमीचे रक्षण करतो आहे.

कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2) आज कारगिल विजय दिनी देशासाठी शहीद झालेल्या सर्व भारतीय जवानांना भावपुर्ण श्रदधांजली

आपल्या मातृभुमीच्या हितासाठी आपले सर्वस्व अपर्ण करणारया भारताच्या शहीद जवानांना माझे शत शत नमन

कारगिल विजय दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

3) कारगिल विजय दिवस हा आपल्या भारत देशातील सैन्याच्या शौर्याचे वीरतेचे कथन करणारा दिवस आहे.त्यांनी आपल्या देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करण्याचा दिवस आहे.

मातृभुमीसाठी शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना शत शत नमन

कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

4) डोळे उघडल्यावर समोर देशाची धरती असो

डोळे बंद केल्यावर डोळयासमोर सदैव भारत देशाची आठवण असो

आम्हाला मृत्यु जरी आला तर दुख तसेच पर्वा नाही

पण मरण देखील हे आम्हास आमच्या देशाच्याच मातीत मिळो

कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा

5) अनेक प्रेमी युगानुयुगे भेटतात,
पण देशापेक्षा सुंदर प्रेमी दुसरा कोणी नाही
आजवर नोटांमध्ये गुंडाळून,सोन्यात पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे.
पण तिरंग्यापेक्षा सुंदर शवपेटी दुसरी कोणती नाही.

See also  गंधकाचे महत्व,गंधकाचे कार्ये -पिकाच्या वाढीसाठी आवश्यक घटक - Sulfur major plant nutrient Marathi information

कारगिल विजय दिवसानिमित्त मातृभुमीसाठी शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना भावपूर्ण श्रदधांजली

6) मी माझ्या हृदयामध्ये नेहमी धाडसाचे वादळ घेऊन चालतो, मी हिंदुस्थान आहे
मी पाण्यानेही दिवे पेटवण्याचे कौशल्य जाणतो,मी भारतीय सेना आहे.

7) कधी वाया नही जाणार देशाच्या भुमिपुत्रांचे हे बलिदान पिढयान पिढया आठवण राहील त्यांनी देशासाठी केलेले त्याग अणि बलिदान.

कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा