ऑपरेशनकावेरी काय आहे? ऑपरेशनकावेरीचा मुख्य हेतु काय आहे? – Operation Kaveri Sudan

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

ऑपरेशन कावेरी काय आहे? ऑपरेशन कावेरीचा मुख्य हेतु काय आहे?

सुदान मध्ये अडकलेल्या भारतीय नागरीकांची सुटका करण्यासाठी आॅपरेशन कावेरी भारताकडून आॅपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे.

हया या ऑपरेशनकावेरी अंतर्गत भारतातील जहाज अणि विमानांच्या साहाय्याने सुदान मध्ये अडकलेल्या भारतीय नागरीकांना आपल्या मायदेशी आणले जाणार आहे.

सुदान मध्ये लष्कर अणि निम लष्कर यांच्यात संघर्ष पेटलेला आहे.सुदान मध्ये गृहयुद्ध सुरू आहे.

मागील ११ दिवसांपासून सुदान मध्ये युद्धाचे वातावरण चालु आहे.हया युदधात शंभरपेक्षा अधिक भारतीय नागरीक मृत्युमुखी देखील पडले आहेत.

सुदान मधील ह्या लष्करी निमलष्करी मधील भीषण युद्धामुळे ५० लाखापेक्षा अधिक लोकांनी राजधानी खार्टुम सोडुन पलायन केले आहे.

अनेक परदेशी नागरीक सुदान मध्ये ह्या युद्धामुळे वीज तसेच पाण्याविना एका खोलीत अडकले गेल्याचे सांगितले जाते आहे.त्यांना हया युद्धामुळे बाहेर पडणे कठीण झाले आहे यात भारतीयांचा देखील समावेश आहे.

सुदान मध्ये आपल्या भारत देशातील सुमारे चार ते पाच हजार नागरिक वास्तव्य करीत आहेत.ह्या दोन गटातील भीषण युद्धामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.त्यांच्या सुरक्षितते बाबद प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत.

अशा परिस्थितीत सुदान मधील भारतीय नागरिकांच्या जीविताला कुठलीही हानी पोहोचु नये त्यांना सुरक्षितपणे लवकरात लवकर आपल्या भारतात सुखरूपपणे आणले जावे म्हणून भारत सरकारच्या वतीने हे आॅपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे.

काल नरेंद्र मोदी यांनी ह्या ऑपरेशन घोषणा केरळ मध्ये केली होती.

सुदान मधील युदधाचे कारण काय आहे? Operation Kaveri Sudan

देशावर ताबा प्राप्त करण्यासाठी सुदान मध्ये सत्ता संघर्षासाठी दोन लष्करी अधिकारींमध्ये युदध छेडले गेले आहे ज्यात विनाकारण तेथील रहिवासी असलेल्या नागरीकांना अणि परदेशातील लोकांना आपला बळी द्यावा लागतो आहे.

असे सांगितले जाते आहे की सुदान मधील लष्कर प्रमुख अणि निमलष्कर प्रमुख या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून सुदान मध्ये कोणाची सत्ता राहील यावरून संघर्ष सुरू आहे.

See also  Check- रतन टाटा नवीन वर्ष 2023 निमित्त मोफत रिचार्ज आॅफर खर आहे की खोटे - Ratan tata New year 2023 free recharge offer real or fake in Marathi

उणीपुरी नावाच्या देशावर ताबा प्राप्त करण्यासाठी हे युदध राजधानी खातुम येथे सुरू असल्याचे सांगितले जात आहे.‌हया देशाची संख्या सुमारे साडेचार कोटी इतकी आहे.

या दोन सुरू असलेल्या सत्ता संघर्षामध्ये दोन्ही गटाकडून गोळीबार,हवाईहल्ले केले जात आहे.ज्यात सर्वसामान्य लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

सुदान मध्ये अडकलेल्या भारतीय नागरीकांना सुरक्षित आपल्या देशात आणण्यासाठी हवाई दलाची दोनसी १३० विमान तसेच नौदलचे आय एन एस सुमेधा जहाज सौदी अरेबिया तसेच सुदानला पोहोचली आहेत.

सौंदी अरेबिया मधील जैदाह येथे हवाई दलातील जहाजे भारतीयांना आणण्यासाठी तैनात करण्यात आली आहे.अणि आय एन एस सुमेधा सुदान येथील बंदरात पोहोचले देखील आहे असे सांगितले जात आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा