Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordfence domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/webshodhinmarathi/public_html/wp-includes/functions.php on line 6170
भारतरत्न पुरस्काराविषयी माहीती - भारतरत्न पुरस्कारार्थी 1954 ते आजपर्यंत - Bharat Ratna Awardee list In Marathi - वेब शोध

भारतरत्न पुरस्काराविषयी माहीती – भारतरत्न पुरस्कारार्थी 1954 ते आजपर्यंत – Bharat Ratna Awardee list In Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

भारतरत्न पुरस्काराविषयी माहीती – भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती

 जेव्हा एखादी कतृत्ववान व्यक्ती देशाच्या प्रगतीसाठी तसेच आपल्या देशाच्या उत्कर्षासाठी आपले अमुल्य असे योगदान देत असते.

तेव्हा त्या व्यक्तीच्या ह्या वैशिष्टयपुर्ण कामगिरीचा गौरव करण्यासाठी त्याचे तोंडभरून कौतुक करण्यासाठी भारत सरकारकडुन त्याला एक विशेष सम्मान तसेच पुरस्कार दिला जात असतो.ज्याला भारतरत्न पुरस्कार असे म्हटले जाते.

भारतरत्न हा एक सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.जो कला,विज्ञान,साहित्य,जनसेवा इत्यादी क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्यावर दिला जात असतो.

आजच्या लेखात आपण ह्याच सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पुरस्कार भारतरत्न पुरस्काराविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

भारतरत्न पुरस्कार काय आहे?

भारतरत्न हा एक भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे जो अशा व्यक्तींना दिला जातो जे आपल्या देशाची किर्ती आपल्या निवडलेल्या क्षेत्रातील उत्तम कार्याद्वारे जगभरात पसरवण्याचे काम करत असतात.

आणि आपल्या स्वताच्या नावासोबत आपल्या देशाचे नाव देखील मोठे करतात.

यात खासकरून अशा व्यक्तींना सम्मानित करण्यात येते.जे आपले संपुर्ण आयुष्य आपल्या कार्यासाठी वेचलेले असते.

सर्वप्रथम हा पुरस्कार व्यक्तीला जिवंतपणे दिला जात होता.पण 1955 मध्ये कायद्यामध्ये काही बदल केले गेले होते.ज्यात असे नमुद देखील करण्यात आले होते की जिवंतपणे तसेच मृत्युनंतर देखील भारतरत्न हा पुरस्कार दिला जाईल.

आतापर्यत खुप जणांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे ज्यात काही नावे परदेशातील व्यक्तींची देखील असलेली आपणास दिसुन येते.

सुरूवातीला एका निवडक तसेच विशिष्ट क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जात होता.पण नंतर ही अट काढुन टाकण्यात आलेली आपणास दिसुन येते.

See also  गोवा बनले मोफत आयव्ही एफ सुविधा देणारे देशातील पहिले राज्य - Goa govt announced free IVF treatment for women

भारतातील पहिला भारतरत्न पुरस्कार हा डाँ राजेद्रप्रसाद यांच्या हस्ते 2 फेब्रूवारी 1954 रोजी डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला होता.

 

भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप काय असते?

आपल्याला प्रत्येकाच्या मनात हे जाणुन घेण्याची उत्कंठा असते की भारतरत्न ह्या पुरस्काराचे स्वरुप काय असते.यात सम्मान म्हणुन किती रक्कम दिली जाते.तसेच कोणते पदक बहाल केले जाते.

ह्या स्वरूपाविषयी आपण निश्चित सांगु शकत नाही कारण यात थोडेफार कमी जास्त बदल देखील होत असतात.

पण ह्या पुरस्काराचे सामान्य स्वरूप सांगावयास गेले तर यात एक सोनेरी पिंपळाचे पान असते ज्याच्या मध्ये सुर्याची प्रतिमा,चित्र असते आणि त्याखाली भारतरत्न असे लिहिलेले असते.

आणि त्याच्याच बाजुला आपल्या देशाचे राष्टीय चिन्ह आणि सिंहाचे चित्र देखील दिलेले असते.आणि सत्यमेव जयते असे लिहिलेले असते.

सोबत राष्टपतींची सही देखील केलेली असते.आणि हा पुरस्कार आपल्याला व्हाईट लेससोबत दिला जातो.

1999 चे साल वगळता एका वर्षात फक्त कमीत कमी तीन व्यक्तींना ह्या पुरस्काराने गौरविण्यात येत असते.कारण 1999 मध्ये चार व्यक्तींना ह्या पुरस्काराने गौरविले गेले होते.

ह्या पुरस्कारावर 1977 मध्ये बंदी घालण्यात आली होती.पण 1980 मध्ये इंदिरा गांधी यांनी पुन्हा हा पुरस्कार देणे सुरू केले जाते.

हा पुरस्कार ज्यांना प्राप्त होतो त्यांना कुठलीही विशेष रक्कम दिली जात नाही किंवा मानधन प्राप्त होत नसते.पण काही विशेष सुविधा शासनाकडुन दिल्या जात असतात.ज्या पुढीलप्रमाणे असतात.

 

  • पुरस्कार प्राप्त व्यक्तीला इंडियन आँर्डर आँफ प्रोसिडन्समध्ये सातवा क्रमांक प्राप्त होतो.
  • भारतात फस्ट क्लास विमान तसेच रेल्वे सेवेचा लाभ प्राप्त होतो.
  • पुरस्कार प्राप्त व्यक्तीला झेड टाईप सिक्युरीटी दिली जाते.
  • राज्यसभा आणि लोकसभेच्या अधिवेशनात उपस्थित राहता येते.
  • इन्कम टँक्समध्ये देखील चांगली सुट प्राप्त होते.
  • पुरस्कार प्राप्त व्यक्तीच्या नातेसंबंधींपैकी एकाला सरकार नोकरी दिली जाते.

 

भारतरत्न पुरस्काराचे विजेते कोण कोण आहेत?

भारतरत्न हा पुरस्कार आतापर्यत 48 व्यक्तींना देण्यात आलेला आहे.

See also  शिव चालीसा लिरिक्स,शिवचालीसेचे फायदे महत्व - shiv chalisa lyrics,shivchalisa importance and benefits

यात मृत्युनंतर भारतरत्न प्राप्त झालेल्या व्यक्तींमध्ये पहिले नाव लाल बहादुर शास्त्री यांचे आहे.

भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:Bharat Ratna Awardee list In Marathi

  • भारताचे माजी राष्टपती तसेच थोर शिक्षणतज्ञ डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण -1954

 

  • भोतिक शास्त्रज्ञ सी व्ही रमण -1954

 

  • भारतीय स्वतंत्रता चळवळीचे नेते आणि लास्ट गर्वहनर जनरल सी राजगोपालचारी -1954

 

  • भारताचे पहिले राष्टपती डाँ राजेंद्रप्रसाद -1962

 

  • माजी राष्टपती झाकीर हुसैन -1963

 

  • भारताचे चौथे राष्टपती व्यंकट गिरी -1975

 

  • भारताचे पहिले एज्युकेशन मिनिस्टर अब्दुल कलाम -1997

 

  • प्रणव मुखर्जी -2019

 

  • नानाजी देशमुख -2019 मृत्युनंतर

 

  • भुपेन हजारीका -2019 मृत्यनंतर

 

  • भारताच्या स्वातंत्र चळवळ नेते

         डाँ भगवान दास -1955

 

  • बँक आँफ म्हैसुरचे संस्थापक मोक्षगुंडम विश्ववेश्वरम -1955

 

  • भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू -1955

 

  • भारताचे दितीय होम मिनिस्टर वलल्भ पंत -1957

 

  • थोर समाजसेवक,समाजसूधारक महर्षी धोंडो केशव कर्वे -1958

 

  • पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री विधान चंद्र राँय -1961

 

  • शिक्षणप्रचारक पुरूषोत्तम दास -1961

 

  • शिक्षणप्रसारक पांडुरंग वामन काने -1963

 

  • पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी -1971

 

  • मद्रासचे मुख्यमंत्री के कामराज -1976

 

  • भारताची आगळी आई मदर टेरेसा -1980

 

  • समाजसुधारक विनोबा भावे -1983

 

  • भारतीय स्वातंत्र चळवळीत काम करणारे बिगर भारतीय नेता खान अब्दुल गफफार खान -1987

 

  • तामिळनाडुचे मुख्यमंत्री तसेच अभिनेता एम जी रामचंद्रन -1988

 

  • संविधानाचे जनक बाबासाहेब आंबेडकर -1990

 

  • वर्णभेद विरोधी चळवळ नेते नेल्सन मंडेला -1990

 

  • देशाचे सातवे पंतप्रधान राजीव गांधी -1991

 

  • भारत देशाचे पहिले गृहमंत्री तसेच स्वातंत्र्य चळवळ प्रमुख नेते सरदार वल्लभाई पटेल -1991

 

  • भारताचे पाचवे पंतप्रधान मोरारजी देसाई -1991

 

  • उद्योजक रतन टाटा – 1992
See also  TATA IPL 2023 - A complete schedule of TATA IPL 2023 - टाटा आयपीएल 2023 वेळापत्रक

 

  • फिल्म प्रोडयुसर सत्यजित रे – 1992

 

  • भारताचे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा -1997

 

  • भारतीय स्वातंत्र चळवळीचे नेते अरुणा असफ अली -1997

 

  • कर्नाटक गायिका एम एस सुब्बालक्ष्मी -1998

 

  • भारताचे माजी कृषीमंत्री चिंदमबरम सुब्रहमण्य -1998

 

  • भारतीय स्वातंत्र्यता सेनानी जय प्रकाश नारायण -1999

 

  • सतारवादक रवी शंकर -1999

 

  • प्रप्ख्यात अर्थतज्ञ अमरत्य सेन -1999

 

  • आसामचे मुख्यमंत्री गोपीनाथ बारदोलोई-1999

 

  • भारताची गानकोकिळा लता मंगेशकर -2001

 

  • सनई वादक बिस्मिल्ला खाँ -2001

 

  • शास्त्रीय संगीतकार भीमसेन जोशी -2008

 

  • साईंटिस्ट सी एन आर राव -2014

 

  • मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर -2013

 

  • शिक्षणतज्ञ मदनमोहन मालवीया -2014

 

  • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी – 2014

सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे

 

4 thoughts on “भारतरत्न पुरस्काराविषयी माहीती – भारतरत्न पुरस्कारार्थी 1954 ते आजपर्यंत – Bharat Ratna Awardee list In Marathi”

Comments are closed.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा