Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordfence domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/webshodhinmarathi/public_html/wp-includes/functions.php on line 6170
पवित्र पोर्टल म्हणजे काय? पवित्र पोर्टलवर नावनोंदणी करण्याचे फायदे तसेच महत्त्व - What is Pavitra Portal Maharashtra? How to do Pavitra Portal Online Registration - वेब शोध

पवित्र पोर्टल म्हणजे काय? पवित्र पोर्टलवर नावनोंदणी करण्याचे फायदे तसेच महत्त्व – What is Pavitra Portal Maharashtra? How to do Pavitra Portal Online Registration

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

पवित्र पोर्टल म्हणजे काय? पवित्र पोर्टलवर नावनोंदणी करण्याचे फायदे तसेच महत्त्व

ज्या उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली आहे अणि ते त्यात उत्तीर्ण होऊन सिलेक्ट देखील झाले आहे.

त्यांना यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी निघत असलेल्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करायचा असतो.अशा सर्व उमेदवारांनी पवित्र पोर्टल ह्या आॅनलाईन संकेतस्थळावर जाऊन आपले नाव रेजिस्टरेशन करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र सरकारकडुन शिक्षक भरतीकरीता पवित्र पोर्टलवर जाऊन ही नाव नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
ह्या पोर्टलवर ज्यांनी आपले नाव नोंदणी केली आहे त्यांना शिक्षक पदासाठी निघालेल्या भरतीसाठी अर्ज करता येत असतो.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीसाठी पवित्र नावाचे एक आॅनलाईन पोर्टल संकेतस्थळ तयार केले आहे.

ह्या पोर्टलवर जो उमेदवार आपली नावनोंदणी करत असतो त्याला शिक्षक भरती परीक्षेसाठी बसता येत असते.शिक्षक पदासाठी अर्ज करता येत असतो.

शिक्षक भरती प्रक्रिया मध्ये अधिक अचुकता अणि पारदर्शकता निर्माण करण्यासाठी शासनाने हे आॅनलाईन पोर्टल सुरू केले आहे.

कोण आहेत कानपुरचे करोली बाबा त्यांचे नाव सध्या एवढ्या चर्चेत का आहे?

पवित्र पोर्टलचे महत्व तसेच फायदे काय आहेत?

What is Pavitra Portal

जेव्हा शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होते तेव्हा त्या भरतीप्रक्रिया दरम्यान शिक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पवित्र पोर्टल वर आपले खाते उघडलेले असणे गरजेचे आहे.

ज्या उमेदवारांनी पवित्र पोर्टल वर आपले खाते उघडलेले आहे अशाच उमेदवारांना शिक्षक भरती पदासाठी अर्ज करता येत असतो.

आधी शिक्षक भरती साठी नोंदणी करण्याची प्रक्रिया ही आॅफलाईन पार पाडली जात होती पण यात उमेदवारांचा खुपच वेळ वाया जात होता.

म्हणुन शिक्षक भरतीची प्रक्रिया अधिक सोप्या अणि सुरळीत मार्गाने पार पाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे आॅनलाईन पोर्टल तसेच सेवा सुरू केली होती.

इथे भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवारांना वारंवार आपली वैयक्तिक माहिती भरण्याची आवश्यकता भासत नसते.ज्यामुळे भरतीसाठी अर्ज करत असलेल्या अनेक उमेदवारांना आपला वेळ वाचवण्यास मदत होते.

See also  World Kidney Day 2023 In Marathi : किडनीचा आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

फक्त येथे आपली माहीती भरत असताना उमेदवारांनी व्यवस्थित वाचुन आपली सर्व आवश्यक माहीती भरायची आहे कारण आपण येथे भरलेली माहीती एकदा सेल सर्टिफाय केली गेल्यावर आपणास त्यात कुठलीही दुरूस्ती किंवा बदल करता येत नसतात.

म्हणुन आपण भरलेली सर्व माहिती अचुक बरोबर आहे याची संपूर्ण पणे खात्री झाल्यावरच आपण आपली माहीती अखेरीस सबमीट करायची आहे.

शिक्षक भरती प्रक्रिया मध्ये सर्व उमेदवारांना सारखी संधी प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही शैक्षणिक वेबसाईट २०१८ मध्ये लाॅच केली होती.

राज्यातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या आणि भरतीमध्ये सहभागी असलेल्या उमेदवारांसाठी या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षक भरतीसाठी हे पोर्टल विशेषतः लाॅच करण्यात आले आहे

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा